
मांजरी उप बाजारात दुबार विक्री व खोतेदार पद्धतीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध,संचालकांच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी दिला एकमुखी पाठिंबा
प्रतिनिधी - सचिन सुंबे
हवेली तालुक्यातील मांजरी उपबाजार हा शेतकऱ्यांसाठीच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तयार करण्यात आला असून खोतीदार दुबार विक्रेते दोन ते तीन तासाच्या विक्रीतून मालामाल झाले आहेत. हा बाजार फक्त शेतकऱ्यांच्याच साठी तयार केला असून शेतकरी जगला पाहिजे असे मत संचालक सुदर्शन चौधरी यांनी सांगितले. या दुबार विक्रेत्यांना कुणाचे पाठबळ आहे अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू असून काही थोडया दिवसात या विक्रीला काही नेते पाठबळ देणार असल्याची चर्चा सध्या हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चालू आहे .बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर या बाजारात गेल्या तीन महिन्यापासून संचालक मंडळाने दुबार विक्री बंद केली आहे .त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी संचालक मंडळाचे आभार मानले .दुबार विक्री बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात माल ठेवण्यासाठी जागा पण भरपूर मिळाली असुन बाजारभाव पण जास्त मिळत आहे .त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये आंनदाचे वातावरण आहे व बाजार समितीची वसुली ( फी ) पण वाढली आहे .परंतु आता व्यापाऱ्यांनी काही मुठभर लोकांना हाताशी धरून हवेलीतील छोट्या शेतकऱ्यांवर दबाव आणत आहेत .त्यामुळे पुणे व मुंबईला माल घेऊन जाणारे व्यापारी सुध्दा संप करून मांजरी येथील व्यापाऱ्यांना पाठिंबा देत आहे परंतु मांजरी बाजारात व पुणे मुंबईच्या बाजारात फरक असुन व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा अंत पाहु नये .नाहीतर मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठे एक झाले होते तसे शेतकरी पण एक होऊन व्यापाऱ्यांना एक गड्डी पण देणार नाहीत .हवेलीतील काही मुठभर लोकांना व्यापाऱ्यांनी हाताशी धरून छोट्या शेतकऱ्यांवर दबाव आणत आहे परंतु हवेलीतील संपूर्ण शेतकरी हा संचालक मंडळाच्या बाजुने असुन संचालक मंडळाने या व्यापाऱ्यांना परवानगी देऊ नये. येणाऱ्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये हवेली तालुक्यातील शेतकरी हे जे मूठभर लोक व्यापाऱ्यांच्या बाजूने आहेत त्यांचे सगेसोयरे ,पाहुणेरावळे व ते स्वतः यशवंत कारखाच्या निवडणुकीत उभे राहिले तर पराभव केल्याशिवाय राहणार नाही असे मत शिवाजी काळभोर व अनेक शेतकऱ्यांनी दिले . मांजरी बाजार हा शेतकऱ्यांचा असुन इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पण शेतमाल विक्री साठी आणावा हा शेतकरी बाजार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कुठल्याही शेतकऱ्यांना माल विक्रीचा अधिकार आहे . असे सभापती दिलीप काळभोर यांनी सांगितले . एक शेतकरी संघटना व्यापाऱ्यांची बाजु घेत असुन ही संघटना खरोखरच शेतकऱ्यांची आहे की व्यापाऱ्यांची अशी टीका शेतकऱ्यांनी केली .एकीकडे व्यापाऱ्यांसाठी बाजार समितीला निवेदन दयायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी मटणाचे जेवण ठेवायचे मग आमचा शेतकरी एवढा लालची आहे का .की लगेच या शेतकरी संघटनेच्या जेवणासाठी जाईल .त्यामुळे या शेतकरी संघटनेचा अनेक शेतकऱ्यांनी धिक्कार केला असुन ही संघटना शेतकऱ्यांसाठी काहीही करणार नाही उलट व्यापाऱ्यांच्या बाजुने लढणार आहे .त्यामुळे असल्या संघटनेचा शेतकऱ्यांनी निषेध केला पाहिजे .या संघटनेचा शेतकऱ्यांवर कसलाही दबाव पडणार नाही .उलट या शेतकरी संघटनेला आम्ही विरोध करु असे शेतकऱ्यांनी सांगितले .काही व्यापारी चुकीची माहिती देऊन काही मुठभर लोकांची दिशाभूल करत आहेत . त्यामुळे हवेली तालुक्यातील शेतकरी एक होऊन या विक्रीला विरोध करणार आहे . जर शेतकऱ्यांच्या विरोधात हवेली तालुक्यातील नेते जातील त्यांना येथून पुढील निवडणूकीमध्ये पराभवाचा सामना नक्की करावा लागेल असे शिवाजी शहाजी काळभोर यांनी सांगितले