Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच नव विवाहितेची आत्महत्या

सुखी संसाराच्या स्वप्नाचा आत्महत्येने शेवट, ही मागणी ठरली जीवघेणी, मयुरीसोबत काय घडले?

नागपूर – लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच सासरच्या छळाला कंटाळून एका नव विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना नागपूरमधून समोर आली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरासारखीच घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूरच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मयुरी ठाकरे डाहुले हिचे अभिषेक डाहुले याच्यासोबत २५ एप्रिलला लग्न झाले होते. लग्न झाल्याच्या काही दिवसांमध्येच अभिषेकच्या आई-वडिलांनी लग्नात झालेल्या खर्चाच्या भरपाईसाठी मयुरीकडे पैशाचा तगादा लावायला सुरुवात केली. पण सर्व ठीक होईल असे समजून मयूरीने त्याकडे दुर्लक्ष केले. पण त्रास वाढू लागल्यानंतर मात्र माहेरी आल्यावर तिने वडिलांना सत्य सांगितले. वडिलांनी गटाच्या भीशीमधून २० हजार रुपये दिले. पण मयुरीचा जाच काही थांबला नाही. सासरच्या मंडळींनी फक्त पैशासाठी मयुरीला प्रचंड त्रास दिला. मयुरीला त्यांनी सतत मारहाण केली. या त्रासाला कंटाळून शेवटी ३० मे रोजी मयुरीने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मयुरीच्या आई-वडिलांनी सांगितले की, ‘एक दिवस जावई आणि मुलगी घरी आली. मयुरीने वडिलांना तिला होणाऱ्या रोजच्या मारहाणीची कल्पना आम्हाला दिली नाही. २ लाखांची मागणी होत असल्याचे तिने आम्हाला सांगितले. मयुरीच्या वडिलांनी गटाच्या भीसीचे २० हजार उचलले आणि मयुरीला दिले. थोडा दिलासा मिळेल असे आम्हाला वाटले, पण आता मुलीने आत्महत्या केल्यामुळे त्यांना धक्का बसला आहे.

या घटनेनंतर नागपूर पोलिलांनी मयुरीचा नवरा अभिषेक, त्याचा भाऊ, आई- वडील या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. महाराष्ट्रात अलिकडे हुंडाबळीच्या घटनांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!