
पोलीस अधिकारी सुपेकर आणि अभिताभ गुप्तांचे काजुकतली कांड
जालिंदर सुपेकर बरोबरच अभिताभ गुप्तांवर गंभीर आरोप, कैद्यांची केली फसवणूक, नक्की काय आहे काजुकतली प्रकरण
पुणे – वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचे नाव आल्यानंतर रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुपेकर आणि अभिताभ गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राजू शेट्टी यांनी राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिका-यांनी रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, दीवाळीचा फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी १२०० रूपये किलोची काजूकतली खायला घातली मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही, असे म्हटले आहे. कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचे साहित्य दिले त्या फराळाच्या साहित्याचे दर हल्दीराम ,काका हलवाई व चितळे बंधू यांच्या दर पत्रकाप्रमाणे होते. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास ४० ते ६० टक्के तफावत होती. विशेष म्हणजे मागील दिवाळीत कोणत्याही निवेदिशिवाय ५ कोटींची खरेदी करण्यात आल्याचाही आरोप शेट्टी यांनी केला आहे. शेट्टी यांनी तरुंगात होत असलेल्या रेशनिंग आणि कॅन्टीन साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले आहे. गेल्या ३ महिन्यांपासून राज्यातील तुरूंगात कारागृहात होणारा भ्रष्ट्राचार पुराव्यासह देवूनही का कारवाई झाली नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध समोर आल्यानंतर जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जालिंदर सुपेकर यांची विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावरून आता पदावनती करत उप महासमादेशक होमगार्ड या पदावर पाठवण्यात आलं आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) या पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी अमरावती कारागृत बंदिस्त कारागृहात असणाऱ्या एका कैद्याकडून तब्बल ५०० कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.