Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपाला धक्का! आगामी निवडणूका हा पक्ष स्वबळावर लढणार

निवडणूकीत भाजपाला फटका बसण्याची शक्यता?, कमी जागामुळे घेतला मोठा निर्णय, राजकीय समीकरणे बदलणार?

पटना – बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. पण त्या आधीच सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचा मित्रपक्ष भाजपाची साथ सोडत स्वबळाबर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे भाजपाच्या अडचणीत वाढ होणार आहे.

एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ने वेगळे लढण्याचे संकेत दिले होते. आज मात्र पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी यावर शिक्कामोर्तब करत मोठी घोषणा केली आहे. आपला पक्ष बिहारमधील सर्वच्या सर्व २४३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण सर्व जागांवर लढणार आहोत, हे एनडीएला मजबूत करण्यासाठीच आहे. आमचे ध्येय एकच आहे – बिहारमध्ये एनडीएच्या नेतृत्वाखाली विजय संपादन करणे,” असे पासवान यांनी यावेळी सांगितले. मागील निवडणुकीतही पासवान यांनी आपण मोदींचा हनुमान असल्याचे सांगत स्वतंत्र निवडणूक लढविली होती. यानंतर लोकसभेपूर्वी नितीशकुमार यांची जेडीयू आणि लोजपा यांना पुन्हा भाजपाने एकत्र आणले होते. यानंतर चिराग पासवान केंद्रात नव्या सरकारमध्ये मंत्री देखील झाले आहेत. दरम्यान चिराग पासवान यांची ही घोषणा त्यांच्या पक्षाच्या आगामी निवडणुकीच्या रणनीतीचा भाग मानली जात आहे. त्यांच्या या पावलामुळे बिहारमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान चिराग पासवान यांनी २०२० ची निवडणूक कुणाशीही आघाडी न करता लढविली होती. या निवडणुकीत यांच्या पक्षाला 5.66 टक्के मते मिळाली होती. संयुक्त जनता दलाच्या जागा कमी करण्यात त्यांच्या पक्षाचा वाटा मोठा होता, असे आकडेवारीवरून स्पष्ट झाले होते. नितीश कुमार यांना केवळ ४३ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे त्यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता.

केंद्रात भाजपचे सरकार नितीशकुमार यांच्या मदतीनेच सुरु आहे. त्यामुळे त्यांना नाराज करणे भाजपसाठी कठीण आहे. चिराग पासवान यांच्या या निर्णयाचा नितिश कुमार यांच्या पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यास पासवान यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी चर्चा सुरु आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!