
…म्हणून स्वप्नालीने विहिरीत उडी मारून संपवले जीवन
तपासात धक्कादायक कारण समोर, सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल, मुलबाळ होऊनही स्वप्नालीला...
सोलापूर – सासरे आणि दिराने घरातील किरकोळ कारणावरून विवाहितेला वारंवार मानसिक, शारीरिक त्रास दिल्याने त्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे उघडकीस आली आहे.
स्वप्नाली संग्राम हजारे असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी सासू-सासरे व दिराच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार मृत स्वप्नाली हिचा विवाह सन 2016 मध्ये आष्टी येथील संग्राम हजारे यांच्या बरोबर झाला होता. विवाह झाल्यावर स्वप्नाली हिस बरेच दिवस मूलबाळ होत नव्हते. त्यामुळे सासू-सासरे व दिर तिला त्रास देत होते. तिच्या बरोबर कोणत्याही कारणावरूनभांडण काढत होते. ही गोष्ट स्वप्नालीने भाऊ व आई यांना सांगितली. त्यावेळी त्यांनी स्वप्नालीवर मंगळवेढा येथील एका खाजगीर रुग्नालयात उपचार केले. त्यानंतर सन २०२० व २०२३ मध्ये स्वप्नालीला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन आपत्ये झाली. यानंतर सर्व व्यवस्थित होईल असे वाटत होते. पण तसे झाले नाही. मृत स्वप्नालीचा पती संग्राम याचा ट्रक ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून तो रेल्वे विभागात गँगमन म्हणून नोकरीस आहे. दरम्यान ट्रक घेण्यासाठी स्वप्नाली च्या नावावर काही कर्ज काढले होते, मात्र त्या कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कडील लोक घरी येत असत मात्र स्वप्नालीचा पती घरी नसल्याने पैशा बाबत ते स्वप्नाली ला बोलून जात होते. अण्णासाहेब हजारे याने स्वप्नाली हिला मारहाणही केली होती. होत असलेल्या त्रासाबद्दल स्वप्नाली वारंवार कुटुंबातील सदस्यांना सांगत होती, आष्टीतीलच मावस भाऊ व मामा-मामींना सासू-सासरे व दिर असे तिघे मिळून त्रास देत असल्याने सहन होत नाही असेही स्वप्नाली सांगत होती. अखेर त्रासाचा कडेलोट झाल्याने तिने शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी तुषार कोळेकर यांनी स्वप्नाली हिचे सासरे सदाशिव हजारे, सासू लता हजारे, दीर अण्णासाहेब हजारे या तिघांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.