Latest Marathi News
Ganesh J GIF

छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला वैतागून तरुणीची आत्महत्या

लवकरच होणार होते लग्न, आरोपींकडून तरुणीवर अत्याचार, आईची उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी

बीड – बीडमध्ये एका तरूणीने लग्नाच्याच दिवशी छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे. मामाच्या घरातच तिने गळफास घेऊन आयुष्य. संपवलं आहे. या प्रकरणी धाराशिव पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला आहे.

साक्षी कांबळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. तिने १४ मार्चला मामाच्या घरी आत्महत्या केली होती. साक्षी कांबळे या तरुणीची अभिषेक कदम हा छेड काढत होता, असा आरोप आहे. शिवाय तिला ब्लॅकमेल केलं जात होतं. या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेतला, साक्षीने आत्महत्या केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती, पण लगेच त्याला जामीन देण्यात आला. यामुळे साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित आपल्या वेदना मांडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात साक्षी कांबळे यांच्या आई म्हणतात, साहेब, मी तुमची लाडकी बहीण आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाला आणि राज्यातील अस्वस्थ झालेल्या बहिणींना आधार मिळाला. आपण मुख्यमंत्री असताना आपल्या म्हणजेच आम्हासारख्या अगणित बहिणींना भावाचा बंध मिळाला. मी नाराज आहे. आज आपण उपमुख्यमंत्री आहात. मात्र माझ्यासाठी तुम्हीच लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री आहात. आज आम्हाला तुमची कमतरता भासते, माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचे होते. मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली. काही मुलांनी तिची छेड काढली आणि साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले. साहेब आम्ही आस धरुन आहोत. तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही, हे आम्हाला देखील माहिती आहे. मात्र त्या क्रूर नराधमांना देखील तेवढी शिक्षा होणे अपेक्षित आहे. असं म्हणत त्यांनी साक्षीच्या गुन्हेगारांना तातडीने शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून केली आहे आहे. दरम्यान साक्षीने १४ मार्च रोजी धाराशिव येथे आत्महत्या केली. तिचा विवाह पुणे येथील एका मुलासह ठरविण्यात आला होता. तिच्या विवाहाची तारीख २० एप्रिल होती. अभिषेक कदम, शीतल कदम यांच्या धमक्यांमुळे तिने आत्महत्या केली आहे, धक्कादायक म्हणजे आरोपींनी साक्षीला धमकी देत तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले होते, त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले.

साक्षी ही बीड जिल्ह्यातील केएसके महाविद्यालयात शिक्षणत होती. तिने १४ मार्चला धाराशिव येथे मामाच्या घरी गळफास घेत आपले जिवन संपवले होते. याला आता एक महिना झाला आहे. असं असताना साक्षीला ज्यांच्या मुळे हे पाऊल उचलावे लागले ते आरोपी मात्र अजून ही मोकाट आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!