Latest Marathi News
Ganesh J GIF

‘मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, मला सरकारमधून मोकळं करावं’; देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीच्या पार्शभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे.4 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला.त्यामध्ये भाजपचे 9 खासदार निवडणून आले आहेत. तर राज्यात काँग्रेसने दमदार पुनरागमन केलं आहे.स्थानिक उमेदवारांवरील नाराजीचा फटका बसल्याचं फडणवीस यांनी बुधवारी (5 जून) पत्रकार परिषदेत सांगितलं.बुधवारचे लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यावर आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये चर्चा आणि मंथनाचे वारे वाहू लागले आहेत.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.येत्या निवडणुकीसाठी नेतृत्वाने मला सरकारमधून मोकळं करावं आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची संधी द्यावी असं देवेंद्र म्हणाले आहेत.ते म्हणाले, “मला विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे मला मंत्रिमंडळाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला करणार आहे.”ते म्हणाले, “ज्याप्रकारे महाराष्ट्रात जागा मिळतील असं वाटलं होतं ते झालं. नाही त्यामागे काही कारणं आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला स्वीकारलं आणि आम्हाला नाकारलं हे नॅरेटिव्ह चुकीचं आहे. लोकांना समान मतं दिली आहेत. कुठेही आम्हाला नाकारलं असं झालेलं नाही.

“आम्हाला फक्त 2 लाख मतं कमी पडली आहेत. मात्र यात जागेचं अंतर जास्त असल्यामुळे मविआला 30 आणि आम्हाला 17 जागा मिळाल्या आहे. मुंबईत मविआला 4 आणि आम्हाला 2 जागा मिळाल्या. मुंबईत मविआपेक्षा आम्हाला 2 लाख मतं जास्त आहेत.शेतीबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात उशीर झाल्यानेही पक्षाला फटका बसल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. तो लवकर माघारी घेतला नाही. याशिवाय सोयाबीन आणि कापूस पिकांचे बाजारभाव ठरवण्यात उशीर झाल्याचं त्यांनी म्हटलं.नरेंद्र मोदी यांनी महाष्ट्रात झंजावती प्रचार केला होता. पण त्यांनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या तिथल्या अनेक ठिकाणी पण भाजपला यश मिळालं नाही. उदाहरणार्थ माढा आणि सोलापूरमध्ये मोदी यांनी दोन दिवस तळ ठोकला होता. सध्या राज्यात लोकसभेतील खासदारांच्या आकडेवारीनुसार सर्वात मोठा पक्ष बनला आहे. काँग्रेसने 13 जागांवर यश मिळवलं आहे.रावसाहेब दानवे, भारती पवार यांच्यासारखे केंद्रीय मंत्री आणि राज्यातील कॅबिनेटमंत्री सुधीर मंनगंटीवार यांच्यासारख्या नेत्यांना यंदा पराभव स्वीकारावा लागला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं ज्या उत्सुकतेनं लक्ष लागलं होतं, त्या उत्सुकतेला महाराष्ट्रानं निराश केलं नाही.कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक लढती अगदी चुरशीच्या ठरल्या.मात्र, अखेरीस महाराष्ट्रातल्या 48 पैकी जास्तीत जास्त जागांवर महाविकास आघाडीनेच बाजी मारली. बीडमधील निकाल जाहीर होण्यासाठी रात्री उशीर झाला. पण त्यानंतर महाराष्ट्रातील 48 जागांचं जय-पराजयाचं चित्रही स्पष्ट झालं.महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच प्रामुख्यानं लढत झालेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 जागा, तर महायुतीला 17 जागा मिळाल्या.सांगलीतील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयानं अपक्ष उमेदवाराला एक जागा मिळाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आम्ही भविष्यातही एकत्र काम करणार असल्याचं म्हटलं आहे.निवडणुकीत हारजित होत असते. एका निवडणुकीमुळे आम्ही खचणार नाही. एकत्र टीम म्हणून भविष्यातही काम करणार असल्याचं शिंदे म्हणाले”आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे सध्याच्या कामगिरीची जबाबदारी ही सामुहिक आहे. आमच्या एकूण जागा जरी कमी झाल्या असल्या तरी राज्यातील मतांची टक्केवारी जास्त आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली.कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांना म्हटले आहे की फडणवीसांनी राजीनामा देऊ नये, सरकार स्थिर राहण्यासाठी त्यांनी मंत्रिमंडळात राहणे आवश्यक आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या निकालानं सत्ताधारी महायुती आणि विशेषतः भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपनं लोकसभेसाठी 45 जागांचं उद्दिष्ट ठेवलं होतं.पण 48 जागांपैकी महाराष्ट्रात महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. एक जागा काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांना मिळाली आहे.महायुतीमध्येही भाजपनं सर्वाधिक 28 ठिकाणी उमेदवार उतरवले होते. पण त्यांचे फक्त 9 उमेदवार विजयी झाले. म्हणजे भाजपच्या चिन्हावर लढणाऱ्या तब्बल 19 उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.विशेष म्हणजे भाजपच्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटिवार, भारती पवार, सुभाष भामरे अशा बड्या नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर त्यांच्याबरोबरच्या शिंदे गटानं मात्र 15 पैकी 7 जागी विजय मिळवल्याचं दिसून आलं.त्यामुळं एकूणच या निवडणुकीत भाजपच्या कामगिरीवर प्रचंड परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 2019 च्या कामगिरीशी तुलना करता यावेळी भाजपची कामगिरी कमालीची घसरल्याचं पाहायला मिळालं.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!