
आदित्य ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होणार?
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात अटक होण्याची शक्यता, दिशाच्या हत्येमागे ठाकरेंचा हात?
मुंबई – आदित्य ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा दावा किशोर तिवारी यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांची इच्छा होईल, तेव्हा आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणात अटक होऊ शकते, असा दावा किशोर तिवारी यांनी केला आहे.
किशोर तिवारी हे याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनामध्ये होते. काही दिवसांपूर्वी किशोर तिवारी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकारण खळबळ उडाली आहे. दिशा सालियन हिने आत्महत्या केली नाही, त्यांचा जीव घेतला गेला. यामध्ये आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा दावा राणे यांनी केला होता. आता किशोर तिवारी यांनी याप्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा इच्छा होईल, तेव्हा आदित्य ठाकरे यांना अटक होईल, तसेच याप्रकरणी आपण प्रयत्न केले नसते, तर आदित्य ठाकरेंना केव्हाच अटक झाली असती, असेही किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. तिवारी यांनी संजय राउत, विनायक राउत, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्री आणि शिवसेना भवनावर कब्जा केल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
कॅबिनेट मंत्री असताना आदित्य ठाकरे दिशा सालियान हिच्या घरी गेले होते. त्याठिकाणी त्यांनी पार्टी केली. त्यानंतर त्या मुलीने आत्महत्या केली, असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान यावर आदित्य ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.