
मोठी बातमी! क्रिकेटपटू विराट कोहलीला अटक होणार?
चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल, ११ जणांच्या मृत्यूमुळे कोहली अडचणीत
बंगळूरु- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चाहत्यांनी बंगळुरु शहरात मोठ्या उत्साहात विजय साजरा केला. या विजयनंतर बंगरुळमध्ये परेडचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या रॅलीला गालबोट लागले. स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे.
आरसीबीचा पहिला विजय साजरा करण्यासाठी बेंगलुरूच्या रस्त्यांवर लाखो चाहते उतरले होते. पण त्यांचा हा उत्साह क्षणार्धात शोकांतिकेत बदलला. विधान सौधपासून एम. चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंतच्या विजयी मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ६७ जण जखमी झाले. दरम्यान, या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले असतानाच सोशल मीडियावर #ArrestKohli हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे, ज्यामुळे विराट कोहली आणि आरसीबीवर टीकेची झोड उठली आहे. बेंगळुरुमधील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर #ArrestKohli हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. अनेक नेटक-यांनी विराट कोहलीवर टीका करत त्याला या दुर्घटनेसाठी जबाबदार ठरवले आहे. विशेष म्हणजे घटनेच्या दुस-या दिवशी ५ जून रोजी कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना मुंबई विमानतळावर पाहण्यात आले, ज्यामुळे काहींनी त्याच्या लंडन प्रवासाला ‘असंवेदशील’ ठरवले आहे. या प्रकरणात अनेकजणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असली तरी कोहलीवर अद्याप कोणत्याही गुन्हा दाखल केलेला नाही. एचएम व्यंकटेश यांनी विराट कोहलीवर केलेल्या तक्रारीत म्हटलंय की, विराट कोहली आरसीबीचा प्रमुख चेहरा असून त्याच्यामुळेच मोठ्या संख्यने लोक बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर एकत्रित झाले होते. कोहलीसह आरसीबीच्या संघावर या प्रकरणात गुन्हा दाखल करून त्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अशी व्यंकटेश यांनी केली आहे. तर विराट कोहली विरोधातील तक्रारीनंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवलेला नाही. संबंधित प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्याअंतर्गत तपासात या तक्रारीसंदर्भातील समीक्षण करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. एकुणच विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आरसीबीच्या जेतेपदाचे सेलिब्रेशन वेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक झाली आहे. यातआरसीबीचे वरिष्ठ अधिकारी निखिल सोसाले यांच्यासह इवेंट मॅनेजमेंटमधील तिघांचा समावेश आहे. ६ जूनला या चौघांना अटक करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना सत्र न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.