Latest Marathi News
Ganesh J GIF

ब्रेकिंग! भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित

सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयची मोठी घोषणा, अनिश्चित काळासाठी स्पर्धा स्थगित, सामने कधी होणार?

मुंबई – भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सुरु असलेले आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्यात निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्तानकडून ८ तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यामुळे धर्मशाला इथे सुरु असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना मध्येच थांबवण्यात आला होता. त्यामुळॆ सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. आयपीएलचे एकूण १६ सामने शिल्लक होते. हे १६ सामने आता नंतर खेळवण्यात येतील. मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान लीग ही स्पर्धा देखील स्थगित करण्यात आली होती. सीमेवर वाढलेल्या तणावामुळे भारत पाकिस्तान युध्द आणखी भडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. आयपीएलमधील सर्व संघांमध्ये अनेक परदेशी खेळाडू आहेत. या परेदशी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्पर्धा जरी दुसरीकडे घेतली तरी पंजाब दिल्ली सामन्यासारखा तो सामना अचानक रद्द करावा लागू शकतो, त्यामुळे आयपीएल स्पर्धा तुर्तास थांबवून उर्वरित आयपीएलची स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. दरम्यान आयपीएल स्थगित झाल्याने प्रायोजक, ब्रॉडकास्टिंग राईट्स, फ्रँचायझी आणि जाहिरातदार यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणरेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधी उल्लंघन होत असून, ड्रोनद्वारे हल्ले आणि प्रत्यक्ष गोळीबार सुरू आहे. अशा परिस्थितीत देशातील मोठ्या शहरांमध्ये आयपीएल सामने खेळवताना प्रेक्षक, खेळाडू आणि आयोजक यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!