Latest Marathi News
Ganesh J GIF

सावधान! महाराष्ट्राला पुढील आठवडाभर पाऊस झोडपून काढणार

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना आॅरेंज आणि यलो अलर्ट जारी, पहा कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?, छत्री घेऊन बाहेर पडा

मुंबई – राज्यात अवकाळी पावसामुळे सध्या प्रचंड नुकसान होत आहे. मागील आठवड्याभरापासून राज्यात सगळीकडे पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीचेही नुकसान होत आहे. पण आता आणखी पाच दिवस अवकाळीचा तडाका महाराष्ट्राला सहन करावा लागणार आहे.

पावसात अवकाळी पावसामुळं शेतीचे अतोनात नुकसान झालं आहे. पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील आठवडाभर राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तसंच हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील ४-५ दिवस अवकाळी पाऊस होणार आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढील २ दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी पुढील चार पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर २९ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूरला या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे.

अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन झाले आहे. या ठिकाणी सध्या हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमानात वाटचाल करणार आहे. नियोजित वेळेच्या आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!