
महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती होणार?
प्रजासत्ताकदिनी होणार घोषणा? 'हे' असणार नवीन २१ जिल्हे, समीकरणे बदलणार?
मुंबई – महाराष्ट्रात आजघडीला ३६ जिल्हे आहेत. पालघरनंतर एकही नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली नाही. पण महाराष्ट्रात अनेक नवीन जिल्ह्याची सतत मागणी होत असते. अनेक जिल्हे आकारमानाने मोठे असल्यामुळे अनेक जाणकार नवीन जिल्ह्यांच्या मागणीला पाठिंबा देत असतात. पण आता राज्यात लवकरच नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे.
महाराष्ट्रात प्रशासकीय गती आणण्यासाठी २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हे आहेत. पण यातील बहुतांशी जिल्हे हे क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने फार मोठे आहेत. यामुळे राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असणाऱ्या जिल्ह्यांचे विभाजन झाले पाहिजे अशी मागणी आहे. या मागणीसाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान मध्यंतरी उदगीर जिल्हा तयार करण्यास आल्याची बातमी व्हायरल झाली होती. पण नंतर मात्र ती अफवा असल्याचे समोर आले. त्यामुळे आता नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच नवीन जिल्हे निर्माण झाल्यास राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
नवीन जिल्ह्यांची प्रस्तावित यादी
भुसावळ (जळगाव)
उदगीर (लातूर)
अंबेजोगाई (बीड)
मालेगाव (नाशिक)
कळवण (नाशिक)
किनवट (नांदेड)
मीरा-भाईंदर (ठाणे)
कल्याण (ठाणे)
माणदेश (सांगली/सातारा/सोलापूर)
खामगाव (बुलडाणा)
बारामती (पुणे)
पुसद (यवतमाळ)
जव्हार (पालघर)
अचलपूर (अमरावती)
साकोली (भंडारा)
मंडणगड (रत्नागिरी)
महाड (रायगड)
शिर्डी (अहमदनगर)
संगमनेर (अहमदनगर)
श्रीरामपूर (अहमदनगर)
अहेरी (गडचिरोली)