Latest Marathi News
Ganesh J GIF

पार्सल बाॅम्ब पाठवत केली नवीन लग्न झालेल्या जोडप्याची हत्या

सुडाने पेटलेल्या शिक्षकाचे राक्षसी कृत्य, बाॅम्ब पाठवत कुटुंबाला ठार मारण्याचा कट, त्या निनावी पत्रामुळे फसला

भुवनेश्वर – लग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर बाॅम्बद्वारे हत्या करण्यात आलेल्या जोडप्याच्या मारेकऱ्याला अटक करुन शिक्षा देण्यात पोलीसांनी यश आले आहे. बनावट नाव आणि पत्ता वापरूनही एका पत्राद्वारे पोलीसांनी आरोपीला अटक करण्यात यश मिळवले होते.

१८ फेब्रुवारीला साैम्या आणि रीमा यांचा विवाह झाला होता. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. पण २३ फेब्रुवारीला घरात त्या दोघांबरोबर आजी असताना एक कुरीअर आले होते. ते कुरीअर उघडत असताना झालेल्या स्फोटात रीमाचा पती सौम्य आणि त्याची आजी जेमामणी साहू यांचा मृत्यू झाला. ते दोघेही ९० टक्के भाजले होते. रीमा या घटनेत वाचली, पण तीदेखील गंभीर भाजली होती आणि तिच्या कानाचा पडदाही फाटला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपासाला सुरुवात केली. पण कुरीअर खोट्या पत्त्यावरुन पाठवण्यात आले होते. त्यामुळे तपासात अडचणी येत होत्या, पण पोलीसांनी काही दिवसानंतर एक निनावी पत्र आले त्यात त्या संपूर्ण कुटुंबाची हत्या झाली तरी आमचे नुकसान भरून निघू शकत नाही. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या प्रकरणापासून दूर राहा आणि निष्पाप लोकांना त्रास देणे थांबवा” असे लिहिण्यात आले होते. त्यानंतर पोलीसांनी हत्या करणारा साहु कुटुंबाच्या ओळखीचा असल्याचे सिद्ध झाले. पोलीसांनी ते पत्र साहूच्या पालकांना दाखवल्यानंतर साहूच्या आईने त्या पत्रातील अक्षर आणि लिहिण्याची स्टाईल ही त्यांच्या काॅलेजमधील इंग्रजी विषयाच्या शिक्षकाचे असल्याचे सांगितले. या इंग्रजी शिक्षकाचे नाव पुंजीलाल मेहर होते. त्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आणि हत्येमागचे कारण जाणून घेतले. हत्येच्या सात वर्षानंतर पुंजीलाल मेहर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पुंजीलाल १९९६ मध्ये इंग्रजी शिक्षक म्हणून महाविद्यालयात रुजू झाला आणि २०१४ मध्ये त्याला प्राचार्य बनवण्यात आले. पण नंतर त्याला काढून टाकण्यात आले आणि सौम्यच्या आईला प्राचार्य बनवण्यात आले तेव्हाच त्याने बदला घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून ही हत्या करण्यात आली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!