Latest Marathi News
Ganesh J GIF

अभूतपूर्व वादानंतर पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वादाचे ग्रहण, त्या दोन पैलवानांचे एवढ्या वर्षासाठी निलंबन, काय घडलं?

अहिल्यानगर- अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या ६७व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पैलवान पृथ्वीराज मोहोळने अंतिम फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले. पण या स्पर्धेला वादाचे गालबोट लागले आहे.

पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत पृथ्वीराजला पहिला पॉईंट मिळाला, त्यानंतर दुसरा पॉईंट महेंद्र गायकवाडने मिळवला आणि बरोबरी केली. अतिशय चुरशीच्या या सामन्यात पृथ्वीराजने पुन्हा एक डाव टाकत आणखी एक पॉईंट घेतला. पृथ्वीराज मोहोळने दुसरा पॉईंट घेतल्यानंतर महेंद्र गायकवाडने आक्षेप घेतला आणि पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. परंतु पंचांनी त्याचा पॉईंट कायम ठेवला. पृथ्वीराजला दिलेला दुसरा पॉईंट चुकीच्या पद्धतीने देण्यात आला असे गायकवाडचे मत होते. त्यानंतर काहीसा गोंधळ झाला आणि महेंद्र गायकवाडने मैदान सोडले. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. दरम्यान या स्पर्धेच्या शेवटी जोरदार राडा पहायला मिळाला. उपांत्य फेरीत बाद झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मोहोळने राक्षेला चित केल्यानंतर पंचांनी त्याला विजयी घोषित केले. परंतु शिवराज राक्षेने आपले दोन्ही खांदे मॅटला लागले नाहीत, त्यामुळे आपण पराभूत झालो नाही असा दावा केला. त्याने पंचांकडे रिव्हिव्हची मागणी केली. परंतु पंच आणि शिवराजमध्ये वाद झाल्यानंतर संतप्त शिवराजने पंचांना लाथ मारली, त्यानंतर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली होती. दरम्यान पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पृथ्वीराज मोहोळला मानाची चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. विशेष म्हणजे ‘महाराष्ट्र केसरी’च्या किताबासाठी बक्षीस म्हणून दिली जाणारी मानाची चांदीची गदा ही मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाते. त्याच मामासाहेबांच्या भावकीतील पृथ्वीराज मोहोळने यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’च्या गदेवर नाव कोरले आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांशी गैरवर्तन करणाऱ्या दोन पैलवानांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने तीन वर्षांसाठी निलंबित केल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!