
धक्कादायक ७८५ बायकांनी प्रियकरासाठी केला नवऱ्यांचा खून
आकडेवारीतून धक्कादायक खुलासा, पाच वर्षात पतीच्या हत्या प्रकरणात मोठी वाढ, अशा होत आहेत पतीच्या हत्या?
दिल्ली – लग्नानंतर हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशीला बायको सोनमने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना सगळ्यांना माहित आहे. पण आता एका संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लग्नानंतर प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीच्या हत्या केल्याच्या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पण एका संशोधनात मागील पाच वर्षात ७८५ पतींची हत्या झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या हत्या थेट पत्नीने केल्या आहेत किंवा कोणाच्या मार्फत तरी त्या करवून आणल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या यादीत महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. मागील पाच वर्षात उत्तर प्रदेशमध्ये २७५ पतींची हत्या करण्यात आली आहे तर बिहारमध्ये हा आकडा १८६ आहे. राजस्थानमध्येही पत्नीने १३८ पतींची हत्या केली आहे. महाराष्ट्रातही १०० पतींची हत्या करण्यात आली आहे. पाचव्या क्रमांकावर असलेल्या मध्य प्रदेशमध्ये अशा ८७ घटना घडल्या आहेत. फक्त महाराष्ट्राचा विचार केल्यास २०२० साली १५, २०२१ साली १८, २०२२ साली २०, २०२३ साली २२ आणि २०२४ साली तब्बल २५ पत्नींनी आपल्या पतीची हत्या केली आहे. यात ६० टक्के हत्या प्रियकराच्या मार्फत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे दहा वर्षापूर्वी हे प्रमाण ७ ते ८ टक्के होते ते आता ११ टक्क्यांपर्यत वाढले आहे.
अलिकडच्या विचार केल्यास सोनम आणि राजा रघुवंशी, मुस्कान आणि साैरभ राजपूत आणि रवीना आणि प्रवीण ही हत्या प्रकरणे गाजली होती. महाराष्ट्रातही अशा घटना घडत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.