
धक्कादायक! भरधाव बसचे चाक निखळले आणि…
एसटी बसचा थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद, एसटीचा भोंगळ कारभार, प्रवाशी सुरक्षा वाऱ्यावर
मीरा भायंदर – महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता तर सुरक्षित प्रवास म्हणून ओळखली जाणरी लाल परीचे देखील अपघात होत आहे. असाच एक अपघात वज्रेश्वरी वसई मार्गावर घडला पण चालकामुळे जिवितहानी टळली आहे.
मीरा भाईंदर येथील वज्रेश्वरी- वसई मार्गावर बस अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका भरधाव एसटी बसचं अचानक निखळल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त एसटी बस वज्रेश्वरीहून वसईकडे जात होती. बसमध्ये ३० प्रवासी होते. भरधाव वेगाने जात असताना पारोळ गावाजवळ अचानक बसचे पुढील चाक निखळले. काही क्षणांसाठी बसचे नियंत्रण सुटण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, चालकाने प्रसंगवधान राखत तातडीने रस्त्याच्या बाजुला घेत ब्रेक मारला. चाक निखळल्यानंतर काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चाक निखळल्यानंतर जवळपास २० ते २५ मीटर बस पुढे घासत गेले. ज्यावेळी अपघात झाला, त्याचवेळी समोरून एक ट्रक देखील आला होता. चालकाला बस नियंत्रित झाली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान यामुळे प्रवाशांकडून महामंडळाच्या बसेसवर संताप व्यक्त केला जात आहे.
साैजन्य – मिड – डे
राज्यात नागरिकांना पत्र्याच्या जुन्या बसने प्रवास करावा लागत आहे. या बस रस्त्यात मध्येच बंद पडतात. कधी मर्यादित बससंख्या असल्याने मार्गावर बसच उपलब्ध नसते. तर कधी पुरेसे प्रशिक्षण नसलेल्या चालकांच्या हातात बस मिळाल्याने अपघाताच्या घटना घडत असतात.