
‘या’ खासदाराने लग्नाचे अमिष दाखवत अनेकवेळा लैंगिक शोषण केले
पीएचडी स्काॅलर तरुणीची या खासदाराविरोधात महिला आयोगात तक्रार म्हणाली त्याने स्वित्झर्लंड आणि दिल्लीत....
लखनऊ – नगिना लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या विरोधात पीएचडी स्कॉलर डॉ. रोहिणी घावरी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आझाद यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणात महिला आयोगानेही दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे.
डॉ. रोहिणी या इंदूरच्या आहेत. सफाई कामगाराच्या घरात त्यांचा जन्म झाला होता. त्या २०१९ मध्ये स्वित्झर्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या होत्या. तिथेच त्यांची चंद्रशेखर आझाद यांच्याशी ओळख झाली आणि दोघांमध्ये तीन वर्षांचं रिलेशनशिप सुरू झालं. तसेच स्वतः अविवाहित असल्याचे सांगत आणि लग्नाचे अमिष दाखवत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. रोहिणीने सांगितलं की, चंद्रशेखर यांच्यावर विश्वास ठेवणं ही तिची मोठी चूक ठरली. ‘ते बहिणी-मुलींच्या इज्जतीची किंमत ठेवत नाहीत. त्यांनी भावनिकदृष्ट्या वापर करून मला फसवलं. आता कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवू शकत नाही. मी अनुसूचित जातीतील महिला असून मध्यप्रदेश सरकारच्या शिष्यवृत्तीवर स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे पीएचडीसाठी प्रवेश घेतला. आझाद यांनी आपल्याशी भावनिक नाते निर्माण केले. त्याच्या आश्वासनावर, मी त्याला केवळ वैयक्तिकरित्या स्वीकारले नाही, तर त्याच्या राजकीय मोहिमांना सक्रियपणे पाठिंबाही दिला. जेव्हा मी भारतात आले, विशेषतः दिल्लीत, तेव्हा चंद्रशेखरने मला अनेकवेळा हॉटेलमध्ये आणि द्वारका येथील त्याच्या निवासस्थानी बोलावले आणि माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि तो लवकरच माझ्याशी लग्न करेल असे सांगितले. लग्नाच्या संदर्भात तो मला नेहमीच अंधारात ठेवायचा. पण आज माझा भ्रमनिरास झाला असून आज लोक मला अपमानास्पद वागणूक देत आहेत. त्यामुळे मी मानसिक तणावात असल्याचा आरोप केला आहे. तसेच आता न्यायालयात भेटू असे आव्हान दिले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
https://x.com/DrRohinighavari/status/1937115208050192892?t=SA36QPJGitktfZqBwFLVxg&s=19
पीएचडी स्कॉलर रोहीणीच्या तक्रारीनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. महिला आयोगाने चंद्रशेखर यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले असले, तरी त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनत आहे. या प्रकरणामुळे बहुजन समाज पार्टीत ही खळबळ उडाली आहे.