देशाला हादरवणारी घटना उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी घडली. एका सलून मालकाने तीन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला, यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी एका आरोपीचा एन्काऊंटर केला आहे. त्यामुळे बदायूंतील अनेक भागात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी लोकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक पोलीस ठाण्यांतील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोघांमध्ये जुना वाद होता.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे बदायूंमध्ये आयुष (१४) हा त्याचा भाऊ हनीसोबत गच्चीवर खेळत होता.तेव्हा न्हावी जावेद तेथे आला आणि त्याने दोघींची निर्घृण हत्या केली. हत्या केल्याच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी त्याचे सलून जाळले. स्थानिक नागरिक प्रतिक्रिया देत आहेत. बघा नेमक तिथे काय घडल ? व्हिडिओ बघा 👇