Latest Marathi News
Ganesh J GIF

उपचारासाठी मुंबई आलेल्या कुटुंबाचा हृदयद्रावक मृत्यू

नेहमीचा मुंबई प्रवास ठरला शेवटचा, संपूर्ण कुटुंब संपलं, काय झालं?

मुंबई – एलिफंटा जाणारी खासगी बोट बुधवार बुडाली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेले संपूर्ण कुटुंब पाण्यात बुडाले व त्यांचा मृत्यू झाला आहे. उपचारातून बरे झाले पण समुद्रात बुडून या कुटुंबाचा करुण अंत झाला आहे.

राकेश आहिरे हे दम्याच्या उपचारासाठी दोन दिवसापुर्वी पत्नी व मुलासह मुंबई आले होते. दोन दिवस रूग्णालयात वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आहिरे कुटुंब बुधवारी सायंकाळी मुबंईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला धडक दिली आणि या दुर्घटनेत आहेर कुटुंबीयांचा मृत्यू झाला. या घटनेत राकेश आहेर यांचा जागीच पाण्यात बुडून मुत्यू झाला. पत्नी हर्षदा आणि निधेश यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. सात वर्षांपूर्वी कल्याण येथील हर्षदा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. पाच वर्षापुर्वी त्यांच्या घरात निधेशचा झाला होता. दम्याच्या आजारावर उपचारासाठी ते नेहमी मुंबईला जात असत. आहेर कुटुंबातील तिघांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पाच वर्षापुर्वी निधेशचा जन्म झाला होता. दम्याच्या आजारावर उपचारासाठी राकेश नेहमी मुंबईला जात असत. पण कालचा मुंबई प्रवास त्यांच्यासाठी शेवटचा ठरला आहे.

मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीला एक सुसाट स्पीड बोटीने धडक दिली. या अपघातात नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. १०१ जण सुखरूप बचावले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!