Latest Marathi News
Ganesh J GIF

भारतीय क्रिकेट संघातील या चार क्रिकेटपटूंना अटक होणार?

चिटफंड घोटाळ्याप्रकरणी होणार अटक? एवढ्या कोटींच्या घोटाळ्याची शक्यता?

अहमदाबाद – भारतीय क्रिकेट संघ सध्या खराब फार्ममधून जात आहे. कांगारुविरुद्धची मालिका जिंकण्याबरोबरच कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यसच्या आशा जवळपास संपल्या आहेत. त्यातच आता एका घोटाळ्याप्रकरणी भारतीय संघातील चार खेळाडूंना अटक होण्याची शक्यता आहे.

एका मोठ्या चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीत भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू अडकले आहेत. गुजरात पोलिसांच्या सीआयडी क्राईम ब्रँचने ४५० कोटी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्याप्रकरणी भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल, राहुल तेवतिया, मोहित शर्मा आणि साई सुदर्शन यांना समन्स बजावले आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना बँकांपेक्षा जास्त व्याज देण्याचे आश्वासन दिले होते. पण, अनेक गुंतवणूकदारांनी त्यांचे व्याज न मिळाल्याने कंपनीविरुद्ध तक्रार केली होती. या कंपनीत गिलने १.९५ कोटींची गुंतवणूक केली आहे. पॉन्झी योजनेचा सूत्रधार भूपेंद्र सिंग जाला यांच्याकडे चौकशी केल्यानंतर खेळाडूंना समन्स बजावण्यात आले आहे. या खेळाडूंनी गुंतवलेले पैसे परत केले नसल्याची माहिती जाला यांनी दिली आहे. जाला यांची अनेक खाती आहे. त्या खात्यात सुमारे ५२ कोटी रुपयांच्या व्यवहारांची नोंद झाली आहे. सध्याच्या तपासाच्या आधारे घोटाळ्याची एकूण रक्कम ४५० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. गिल सध्या ऑस्ट्रेलियात असल्याने तो आल्यानंतर त्याची चौकशी होणार आहे.

भूपेन्द्र सिंह जाला यांनी राजस्थानसह देशभरात गुंतवणूक योजनांचे जाळे पसरवत, कमी वेळीत जास्त व्याज देण्याचे आश्वासन देऊन पॉन्झी योजना सुरू केली. सुमारे १४ हजार लोकांनी या गुंतवणूक केली होती. ज्यामध्ये सीआयडीच्या प्राथमिक तपासात जाला यांनी ६ हजार कोटी रुपयांची मोठी फसवणूक केल्याची माहिती समोर आले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!