
जयंत पाटील राजीनामा देऊन भाजपात जाणार?
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे संकेत, शरद पवारांचेही सुचक वक्तव्य, वर्धापनदिनी गोंधळ
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा मेळावा पुण्यात पार पडला. यावेळी भर कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदमुक्त करण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. आज सात वर्षाचा कालावधीमध्ये मी प्रदेशाध्यक्ष आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक असल्याचं जयंत पाटील म्हणाले. असं म्हणतात बालगंधर्व रंगमंदिर येथे एकच गोंधळ झाला अनेक कार्यकर्त्यांनी उठून त्याला विरोध दर्शवला. त्यानंतर याबाबत पवार साहेब यांनी योग्यता निर्णय घ्यावा असं म्हणत जयंत पाटील यांनी भाषण आवरत घेतलं. उपस्थितांना संबोधित करताना जयंत पाटलांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही सडकून टीका केली. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत निराशा झाली समोर विजय दिसत असतांना निकाल वेगळा लागला असे म्हणत निवडणूक संशयास्पद होती. निवडणूक आयोगापेक्षा इतरच लोक स्पष्टीकरण देत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी २०१८ पासून देण्यात आली होती. जयंत पाटील हे जवजवळ सात वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकरत आहेत. मध्यंतरी ते भाजपात जाणार अशी चर्चा होती. कारण महायुती सरकारमध्ये जयंत पाटील यांच्यासाठी एक पद रिक्त ठेवल्याचं देखील बोललं गेलं. मात्र अजूनही जयंत पाटील कुठल्याही पक्षात गेले नाहीत. त्यांनी वारंवार आपण कुठेही जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. मात्र त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा काही थांबताना दिसत नाही
या विषयावर बोलताना शरद पवार यांनी प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊन सुसंवाद साधू आणि सामूहिकपणाने यासंदर्भातील निर्णय घेऊ. निर्णय घेत असताना प्रत्येक जिल्हा, तालुका नवे चेहरे दिसले पाहिजे. आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देत आहोत. अशी सुचक प्रतिक्रिया दिली आहे.