
मोठी घोषणा! मुख्यमंत्र्यांनी बदलली या गावांची नावे
तब्बल १४ गावांची नावे बदलली, जनभावनेनुसार निर्णय घेतल्याचा दावा, पहा नवीन नावे
भोपाळ – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या पावलांवर पाऊल टाकत राज्यातील अनेक शहरांची नावे बदलली आहेत. तशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे आता त्या शहरांना नवीन नावे मिळाली आहेत.
मध्य प्रदेशातील शाहपूर जिल्ह्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री मोहन यादव हजर होते. यावेळी गावकऱ्यांनी गावांची नावे बदलण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी तिथेच मध्य प्रदेशातील ११ गावांची नावे बदलण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशमधील तीन शहरांची नावे आठवडाभरापुर्वी बदलण्यात आली होती.
जुने नाव बदललेले नाव
मोहम्मदपूर मछनाई – मोहनपूर
ढाबला हुसैनपूर – ढाबला राम
मोहम्मदपूर पवाडिया – रामपूर पवाडिया
खजूरी अलाहदाद – खजुरी राम
हाजीपूर – हिरापूर गाव
निपानिया हिसामुद्दीन – निपानिया देव
रिछडी मुरादाबाद – रिछडी
खलीलपूर – रामपूर
घट्टी मुख्तयारपूर – घट्टी
उंचोद – उंचावद
शेखपूर बोंगी – अवधपूरी
आठवडाभरापुर्वी नाव बदललेली गावे
माैलाना – विक्रम नगर
गजनीखेडी – चामुंडा माता नगरी
जहांगीरपूर – जगदीशपूर