Latest Marathi News
Ganesh J GIF

ब्रेकिंग! आरसीबीच्या विजयाला गालबोट ११ जणांचा मृत्यू

टीमला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज आणि धावपळ, व्हिडिओ व्हायरल

बेंगलोर – आयपीएलचा अंतिम सामना काल पार पडला. तब्बल १८ वर्षानंतर आरसीबीने पंजाबचा पराभव करत आयपीएलची ट्राॅपी जिंकली. पहिल्यांदाच बेंगलोर संघाने ही ट्राॅपी जिंकल्यामुळे बेंगलोरमध्ये परेडचे आयोजन करण्यात आले होते. पण यात चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे.

तब्बल १८ वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल जिंकले. या विजयाच्या आनंदात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. दरम्यान चेंगराचेंगरीत एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा विजयसोहळा सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला होता. त्याआधी, स्टेडियममध्ये प्रवेशासाठी केवळ दोन दरवाजे उघडे ठेवण्यात आले होते. यावेळी, समोर असलेल्या सर्व चाहत्यांना १३ आणि १४ नंबरच्या दरवाज्यांकडे जाण्यास आणि तेथून प्रवेश घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे २० हजारांहून अधिक चाहते एकाच वेळी मागच्या दरवाज्यापाशी जमा झाले. यावेळी, दरवाज्यातून एकेकाला तपासणी करून आत सोडण्याची प्रक्रिया संथ असल्याने चाहत्यांची गर्दी वाढली आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन लोकांचा मृत्यू झाला. अनेक जण श्वास न घेता आल्यानं बेशुद्ध पडले आहेत. दरम्यान मृताचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान इतक्या मोठ्या संख्येने चाहते येतील याचा अंदाज असतानाही राज्य सरकारने योग्य ती व्यवस्था केली नव्हती. योग्य बॅरिकेड्स आणि व्यवस्था असती तर हा प्रकार टाळता आला असता. अहमदाबादमध्ये झालेल्या आयपीएल अंतिम सामन्यात आरसीबीने किंग्ज इलेव्हन पंजाबला ६ धावांनी हरवून पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली. ट्रॉफी जिंकताच विराट कोहली भावुक झाला आणि त्याचे अश्रू पाहून चाहतेही भावुक झाले. पण आजच्या घटनेमुळे त्यावर विरजण पडले आहे.

 

 

या घटनेनंतर पोलिसांनी मिरवणूक तात्काळ थांबवली. सुरक्षा कारणास्तव बसमधील मिरवणूक रद्द करण्यात आली आहे . त्याऐवजी, खेळाडूंचा सत्कार विधानसभेमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!