Latest Marathi News
Ganesh J GIF

नारायण राणे यांनी मर्डर केले, म्हणून ते मोठ्या उंचीवर गेले

राणे पुत्रासमोरच शिंदे गटाच्या मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य, भाजपावरही टिका, महायुतीत वादाची ठिणगी

सिंधुदूर्ग – महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. रायगडमधील पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी ते अजूनही प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी अघोरी पुजा केली होती, असे आरोप झाले आहेत. आता गोगावले आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

शिवसेनेच्या एका कार्यक्रमात बोलताना गोगावले यांनी वादग्रस्त विधान केले आहे, विशेष म्हणजे यावेळी निलेश राणे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. तरीदेखील गोगावले यांनी तसे वक्तव्य केले आहे. गोगावले म्हणाले की, नारायण राणे एवढ्या सहजासहजी उंचीवर गेलेले नाहीत, अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर सगळं. वेगळं काही सांगण्याची आवश्यकत नाही, असं विधान गोगावले यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण गेले अनेक वर्ष पाहतोय. निलेश राणेंच्या रुपाने सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद मिळाली. भानगडी केला नाही तो शिवसैनिक नव्हे. केसरकर भानगडी करणारे नाहीत त्यामुळे अडचण होते. मात्र निलेश राणे जशास तसं उत्तर देणारे आहेत. पण आता भानगडी करायचे दिवस संपले आहेत. निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही. सगळं जुळवून चालवायचं आहे असेही मंत्री भरत गोगावले म्हणाले आहेत. येत्या चार महिन्यात निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवताना अत्यंत सावध रहावे लागते. तुम्हाला लागेल ती ताकद देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. केसरकर साहेब भानगडी करणारे नाहीत. ज्याने भानगड केली नाही तो शिवसैनिक होऊ शकत नाही. काही पक्ष आपण शत प्रतिशत आहोत असं म्हणतात. मग आम्ही पण शत प्रतिशत जाऊ शकत नाही का? कोकणात आज आपला पक्ष नंबर एक असल्याचंही ते म्हणाले आहेत, यातून त्यांनी भाजपाला इशारा दिला आहे. तसेच शिंदे गटातील दुफळी देखील समोर आली आहे. दरम्यान भरत गोगावले यांनी घरामध्ये अघोरी पूजा केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ठाकरे गटानंतर आता महायुतीमधील शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही भरत गोगावले यांचा नवीन व्हिडिओ शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून भरत गोगावलेंनी घरात अघोरी पूजा केल्याचा दावा त्यांनी केला होता.

पालकमंत्री ही आम्ही होऊ त्याची पण काळजी करण्याचे कारण नाही जर आम्ही काम करतोय तर त्याचा मोबदला मागतो जो काम करत नाही त्याला मोबदला मागण्याचा अधिकार नाही. जोपर्यंत चुकत नाय तोपर्यंत झुकत पण नाय हा आमचा बाणा आहे बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री पदावर आपला दावा कायम ठेवला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!