Latest Marathi News
Ganesh J GIF

…म्हणून माझ्या वडिलांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून मारले

प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा, शहीद जवानाची मुलगी आहे 'ही' अभिनेत्री

चंदीगड – भारत पाकिस्तान यांच्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला तणाव थोडासा निवळला असला तरी तो संपलेला नाही. काल शस्त्रसंधीची घोषणा झाली आहे, पण पाकिस्तानने आपल्या कुरापती चालूच ठेवल्या आहेत. त्यातच आता अनेकांनी सैन्य दलाबद्दल बोलण्यास सुरुवात केली आहे. असे असताना एका अभिनेत्रीने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अभिनेत्री निमरत कौर हिने आपल्या शहीद वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. १९९४ मध्ये झालेल्या युद्धात काश्मीर येथे दहशतवाद्यांनी भुपेंद्र सिंग यांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या केली. तेव्हा निमरत फक्त १२ वर्षांची होती. त्यावेळेचा प्रसंग त्यांनी सांगितला आहे ती म्हणाली ‘ते एक यंग आर्मी मेजर होते. एक इंजिनियर होते, जे वेरीगान याठिकाणी देशासाठी तैनात होते. काश्मीरमध्ये आमचं घर नव्हतं. त्यामुळे वडील जेव्हा काश्मीरमध्ये गेले तेव्हा आम्ही पटियाला येथेच होतो. १९९४ मध्ये सुट्ट्या होत्या म्हणून आम्ही वडिलांना भेटण्यासाठी काश्मीरला गेलो. तेव्हा दहशतवादी हिज्ब-उल-मुजाहिदीनने माझ्या वडिलांचं अपहरण केलं होतं. जवळपास 1 आठवडा त्यांना बंदी करून ठेवलं. वडिलांच्या सोडण्याच्या बदल्यात दहशतवाद्यांची त्यांच्या काही सहकार्यांना सोडण्याची मागणी केली. पण त्यांनी मागणी मान्य केली नाही. ज्यामुळे दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली. ज्यावेळी माझे वडील शहीद झाले, त्यावेळी ते फक्त ४४ वर्षांचे होते. आम्हाला ज्यावेळी कळालं की, “ते शहीद झालेत, त्यावेळी आम्ही त्यांचं पार्थीव घेऊन दिल्लीला परतलो आणि मी त्यांचं पार्थीव पहिल्यांदा दिल्लीत पाहिलेलं. शहीद मेजर भूपेंद्र सिंह यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आलं. ही घटना जेव्हा घडली तेव्हा १३ मार्च तारीख होती. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. आमचं आयुष्य एका रात्रीत बदललं. पण सैन्य तुमच्यामागे पहाडासारखं उभं राहतं. ते तुमचं कुटूंब आहेत आणि आजही आम्हाला काही हवं असेल तर ते आम्हाला मदत करतात.” असं तिने सांगत भारतीय सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘फक्त देशातच नाही तर, जगातही दहशतवादाला स्थान नसावं. लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. लोकं मुलं आणि पत्नीसह सुट्टीसाठी शांत ठिकाणी गेले होते. पण तेथे हल्ला झाला. देशाची नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी सैन्य आणि भारत सरकारच्या पाठीशी उभं राहीलं पाहिजे… दहशतवादी हल्ले आता थांबलेच पाहिजे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे.

निमरत कौर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक वेबसीरिज आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. ती सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कुल’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीनं यापूर्वी ‘स्काय फोर्स’, ‘दसवी’, ‘साजन शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ आणि ‘एअरलिफ्ट’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!