Latest Marathi News
Ganesh J GIF

“अतिशय भ्याड हल्ला ! अल्लाह आमच्या देशाचं रक्षण करो

'या' अभिनेत्रीची आॅपरेशन सिंदूरवर टीका, इंस्टाग्रामवर पोस्ट करत नोंदवला निषेध

दिल्ली – जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारत पाकिस्तानी दहशतवाद्यांवर या प्रत्युत्तरात्मक कारवाईची मागणी करत होता. आता भारतीय लष्कराने काल रात्री उशिरा हवाई हल्ल्याद्वारे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी व्यापलेले नऊ तळ उडवून दिले आहेत. त्यानंतर पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर, पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने प्रतिक्रिया दिली आहे. तिने
इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करताना तिने लिहिले ‘खूपच भित्रा.’ अल्लाह आपल्या देशाचे रक्षण करो आणि आपल्याला बुद्धी देवो. आमेन.” असे लिहिले आहे. तर पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरनेही इंस्टाग्रामवर एका शब्दात पोस्ट व्यक्त करत तिच्या भावना व्यक्त केला. तिने या कारवाईला कायर म्हणत त्याचा निषेध केला. पहलगनं हल्ल्यानंतर ज्या पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे त्यात हानियाचाही समावेश आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकारांचे अकाऊंट भारतात बॅन करण्यात आले. माहिरा खान, फवाद खान, अली जफर, हानिया आमिर यांचा यात समावेश आहे. याशिवाय फवादच्या अबीर गुलाल या सिनेमाच्या प्रदर्शनावर भारतात बंदी घालण्यात आली. तसंच अनेक पाकिस्तानी चॅनेलही भारतात बॅन करण्यात आले. धन्यवाद भारतीय सैन्याने दिलेल्या अहवालानुसार, ऑपरेशन सिंदूरमध्ये १७ दहशतवादी ठार झाले तर ६० जण जखमी झाले आहेत. दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महिरा खान काहीच बोलली नसल्याने चर्चा सुरु झाल्या होत्या. कारण महिरा खानने शाहरुख खानसोबत ‘रईस’ या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. परंतु, उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टीत बंदी घालण्यात आली आहे.

२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन पठारावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ जणांनी आपले प्राण गमावले होते. या हल्ल्याचा संपूर्ण जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला.

Oplus_131072

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!