Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! तब्बल सात आमदारांचा तडकाफडकी राजीनामा

माजी मुख्यमंत्र्यावर आरोप करत दिला राजीनामा, पक्ष नेतृत्वावर शंका उपस्थित, कारण काय?

दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली आहे. पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मात्र, मतदानाला पाच दिवस बाकी असताना ‘आप’ला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

आपच्या दिल्लीतील सात आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यामध्ये आमदार राजेश ऋषि, आमदार भावना गौड़, आमदार बीएस जून, आमदार पवन शर्मा, आमदार मदनलाल, आमदार रोहित महरौलिया यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या आमदारांना आपने यंदाच्या निवडणुकीसाठी तिकीट दिले नव्हते. आमदार नरेश यादव यांनी पक्षाचा राजीनामा देताना पक्षाला लिहिलेल्या चिठ्ठीत भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. तर आमदार राजेश ऋषी यांनी राजीनामा देताना अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. आम आदमी पार्टीच्या सात आमदारांच्या या ताज्या निर्णयामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी पार्टीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आमदारांच्या पक्ष बदलामुळे पार्टीच्या नेतृत्वावर आणि त्याच्या भवितव्यासाठी संकट निर्माण झाले आहे. दरम्यान या आमदारांच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जगांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या मतदानाला आता फक्त पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे देशाच्या राजधानीत प्रचार शिगेला आहे. यंदा आपली सत्ता राखण्यासाठी आपला मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यांना भाजपाकडून कडवी लढत दिली जाण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!