Latest Marathi News
Ganesh J GIF

आळंदीत पोलीसांचा वारकऱ्यांवर पोलिसांचा साैम्य लाठीचार्ज

माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला गालबोट, तणावाचे वातावरण, यामुळे घडला वाद, व्हिडीओ समोर

पुणे दि ११(प्रतिनिधी)- आषाढी वारी सोहळ्यानिमित्त आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढपरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पण त्या सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यावेळी वारकरी आणि पोलीस यांच्यात झटपट देखील झाली आहे.

माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना वारकरी मंदिर प्रवेश करण्यासाठी आग्रही होते. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वारकऱ्यांनी पोलीस बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांना आणि बॅरिकेट्सना लोटून देत मंदिर प्रवेशासाठी पुढे सरकले मात्र पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला आणि यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. यानंतर थोड्या वेळात प्रकरण शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र हजारोच्या संख्येने असलेले वारकरी मात्र चांगलेच आक्रमक झाले होते. गेल्यावर्षी झालेली गर्दी लक्षात घेता, फक्त ४७ दिंड्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा परवानगी देण्यात आली होती. यातील प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश दिला जात होता, पण वारकऱ्यांनी प्रवेश देण्याचा आग्रह केल्याने पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाली. या घटनेमुळे मंदिर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होते. या प्रकारानंतर पोलिसांनीही मंदिरात बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

 

टाळ – मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर – फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. तसेच हरिनामाचा गजत करत पालखीने पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!