
दिवाळीआधी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले धमाकेदार निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ३ मोठे निर्णय, रोजगारनिर्मिती होणार, शेतकऱ्यांसाठी घेतला हा महत्वाचा निर्णय
मुंबई – दिवाळीच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शिवाय, महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर कऱण्यात आलं आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज झालेली बैठक अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांसह संपली. मंत्रिमंडळाने बांबू उद्योगाला चालना देणारे धोरण, मुंबई उच्च न्यायालयासाठी पदनिर्मिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी विशेष योजना यांसारखे निर्णय घेतले. हे निर्णय राज्याच्या आर्थिक, न्यायिक आणि सामाजिक विकासाला गती देणारे ठरतील.
मंत्री मंडळाचे महत्वाचे निर्णय :
उद्योग विभाग :
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर. धोरण कालावधीत ₹५०,००० कोटींची गुंतवणूक, ५ लाखांवर रोजगार निर्मिती. राज्यात १५ समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करणार. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार.
विधि व न्याय विभाग :
राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना. शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय. (उद्योग विभाग)
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह, अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांकरीता गट अ ते गट ड संवर्गात २२२८ पदांची निर्मिती. त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता. (विधि व न्याय विभाग)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘द पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या विकासासाठी योजना. सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतीगृहांच्या इमारतींचा जीर्णोध्दार, जतन आणि संवर्धन करण्याकरीता नियोजन केले जाणार. मुंबई, छत्रपती संभाजीनगरमधील ९ शिक्षण संस्था, २ वसतीगृहांचे अद्ययावतीकरण. ५ वर्षासाठी ₹५०० कोटीच्या निधीची तरतूद. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)