
फोन पे किंवा गुगल पे वापरत आहात का? मग ही बातमी वाचा
यूपीआय अॅप्लिकेशनचा वापर करण्यासाठीच्या नियमात बदल, डिजिटल व्यवहारावर परिणाम, नवीन नियम कोणते?
दिल्ली – तुम्ही जर रोज फोन पे, गुगल पे आणि पेटीएम यासारख्या यूपीआय अॅप्लिकेशनचा वापर करून मनी ट्रान्सफर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण लवकरच या अॅपच्या वापरच्या नियमात बदल करण्यात आला आहे.
येत्या १ ऑगस्टपासून फोन पे आणि गुगल पेच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. आता तुम्हाला कोणत्याही एका अॅप्लिकेशनवरून दिवसातून फक्त ५० वेळा बॅलन्स बॅलन्स चेक करता येणार आहे. तर लिंक्ड बँक अकाऊंट्स चेक करण्यासाठीही आता मर्यादा येणार आहेत. तुम्हाला मोबाईल नंबरशी लिंक केलेल्या बँक खात्यांची माहिती दिवसातून फक्त २५ वेळा पाहता येईल. तर नेटफ्लिक्स, एसआयपी सारख्या सेवांसाठी पेमेंट फक्त तीन स्लॉटमध्ये करता येणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने व्यवहार प्रणाली जलद आणि सुरक्षित करण्यासाठी अनेक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यूपीआय व्यवहारांसाठी फोन पे, गुगल पे आणि पेटीएमचा सर्वाधिक वापर केला जात आहे. यूपीआय व्यवहारांसाठी सरकारी बँकांचा वापर केला जात असला तरी ॲपवरून व्यवहार करण्यासाठी खासगी बँकांची ॲप अग्रेसर आहेत. या बदलांचा तुमच्या दैनंदिन डिजिटल बँकिंगवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
लोक जलद आणि विश्वासार्ह व्यवहारांसाठी आता यूपीआयवर अधिक अवलंबून असल्याचे दिसत आहे. यातही यूपीआय व्यवहारांत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, एकूण व्यवहारांमध्ये महाराष्ट्राचा वाटा ८.८० टक्के राहिला आहे.