Latest Marathi News
Ganesh J GIF

तीन महिन्यांपूर्वी केलं होत लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन्…

(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) – अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वैभव आमले (वय-२२) आणि स्नेहा आमले (वय-२०) या दोघांचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. वैभव आमले हे पुण्यात नोकरीस होते. दोन दिवसांपूर्वी नुकतंच दोघंही आपल्या गावी साकूरला आले.

या नवविवाहित दाम्पत्याने रविवारी संध्याकाळी साकुर येथील मांगमळीत गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी या नवदाम्पत्याने एका झाडाला दोर बांधून एकत्रच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

घटनेची माहिती घारगाव पोलिसांना कळताच तातडीने घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर नवदाम्पत्यांचा मृतदेह संगमनेर येथील रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या नवदाम्पत्याने आत्महत्या का केली याचा तपास केला जात आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!