Latest Marathi News
Ganesh J GIF

‘तू मला आवडत नाहीस निघून जा, मला दुसरं लग्न करायच आहे’

पतीच्या सततच्या टोमण्याने दुखावलेल्या विवाहितेने उचलल धक्कादायक पाऊल

छ. संभाजीनगर दि ४(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील विवाहितेने पतीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून पतीला पोलीसांनी अटक केली आहे.

निकिता लखन माळी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, चौकशीनंतर याप्रकरणात पती लखन भगवान माळी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निकिता हिचा काही वर्षांपूर्वी वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील लखन याच्याशी विवाह झाला होता. लग्नाच्या नंतर निकिताला पती लखन याने शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. असं असलं तरी संसार टिकवण्यासाठी तिने सर्व काही सहन केलं. ‘तू मला आवडत नाहीस, घरी निघून जा, मला दुसरे लग्न करायचे आहे’ असे म्हणून लखन निकिताला वारंवार त्रास देत होता. या त्रासाला कंटाळुन निकिता हिने रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच निकिता हिच्या माहेरच्या मंडळींनी धाव घेतली. दरम्यान ही घटना पतीच्या त्रासाला कंटाळून घडली असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

निकीताचे वडील इंदास सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यावरुन आरोपीविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!