Latest Marathi News
Ganesh J GIF

या कारणाने लग्नानंतर अकरा महिन्यातच उचलले टोकाचे पाऊल

वडिलांची तयारी पण हर्षादाचा संयम संपला आणि नको ते घडले, बघा काय झाले

गडचिरोली दि १६(प्रतिनिधी)- सासरच्यांकडून छळ असह्य झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील खरकाडा येथील विवाहित महिला हर्षदा महेश बंसोड हिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.विशेष म्हणजे तिच्या लग्नाला केवळ ११ महिनेच झाले हाेते.

मिळालेल्या माहितीनुसार देसाईगंज तालुक्यातील बोडधा येथील हर्षदा गायकवाड हिचा विवाह मागील १९ एप्रिल २०२२ ला खरकाडा येथील महेश बंसोडशी झाला होता. लग्न झाल्यानंतर सुरुवातीलस काही दिवसच हर्षदाला चांगले वागवण्यात आले. पण त्यानंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली गेली. आपला छळ हाेत असल्याने सासरी थांबणे कठीण असल्याची बाब हर्षदाने आपल्या वडिलांना घटनेची आदल्या दिवशी फोन करून सांगितली होती. तसेच आपली माहेरी येण्याची इच्छाही व्यक्त केली हाेती. तिला माहेरी आणण्यासाठी तिचे वडील तयार झाले होते. मात्र ते तिच्या सासरी पाेहाेचण्यापूर्वीच तिने आत्महत्या करत या जगाचा निरोप घेतला. यानंतर सासरच्या लोकांनी आपल्या मुलीला शारीरिक व मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी कुरखेडा पोलिस स्टेशनमध्ये वडिलांनी दाखल केली, तसेच तिचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे करण्यात आले. त्यानंतर बोळदा येथे रात्रीच हर्षदाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.

पोलिसांनी या प्रकरणात हर्षदाचे पती, सासरा, सासू व दिराच्या विराेधात गुन्हा दाखल करून साेमवारी चाैघांनाही अटक केली. घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे करीत आहेत. हर्षदाने काही वेळ संयम बाळगला असता तर ती माहेरी पाेहाेचली असती व तिचे प्राण वाचले असते. अशी चर्चा होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!