ओैरंगाबाद दि १(प्रतिनिधी)-
तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण औरंगाबाद दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काही महिन्यातच राज्यात साडेसात हजार पोलिसांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली आहे.त्यातून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
पुढील काही महिन्यात राज्यात साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे. ओैरंगाबादमधील टीव्ही सेंटर भागातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री यांनी अभिवादन केले. यावेळी तिथे पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक मुलं जमली होती. मुख्यमंत्री येताच तरुणांनी पोलीस भरतीच्या घोषणाबाजीला सुरवात केली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढील काही महिन्यात राज्यात साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे तरुणांनी सुद्धा टाळ्या वाजून त्यांच्या घोषणेचं स्वागत केले. महाविकास आघाडीच्या काळातही भरतीची घोषणा करण्यात आली होती. पण नंतर सरकार कोसळ्यानंतर ती प्रक्रिया थांबली होती.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. यावेळी ओैरंगाबाद दौऱ्यात त्यांनी मराठवाडा आणि राज्यातील अनेक विकास कामांच्याबाबत घोषणा करतानाच, राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून पोलीस भरतीची महत्वाची घोषणा केली आहे.