Latest Marathi News
Ganesh J GIF

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील हे सहा दिग्गज मंत्री नापास

फडणवीस यांनी घेतला मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा, दिग्गज मंत्री नापास, पहा कोण पास कोण नापास?

मुंबई – महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या कालबद्ध कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार फडणवीसांनी महायुतीतील महायुतीतील मंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कामगिरीचा आढावा घेतला असून नेते फेल झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच महायुतीतील महायुतीतील मंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यात मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री त्यांच्या खात्याच्या कामाचे लक्ष्य पूर्ण करू शकले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. लक्ष्य पूर्ण करणाऱ्या मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सामंत, संजय शिरसाट, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा समावेश नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंसह शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नितेश राणे, गणेश नाईक अदिती तटकरे यांच्याही खात्याची कामगिरी असमाधानकारक राहिली आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या खात्याच्या कामाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणखीन पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर त्यांचे रिपोर्ट त्यांनी दिल्लीलाही धाडल्याचे सांगण्यात येत आहे. आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कामगिरी अन्य मंत्र्यांच्या लक्ष्यापेक्षा मागे पडलेले‌ आढळल्याने धक्का बसला. तसेच अन्य ज्येष्ठ मंत्रीही त्यांचे टार्गेट पूर्ण करु शकले नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट समज न देता विशेष काळजी घेऊन सूचना दिल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तारावेळी समाधानकारक कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षानंतर वगळण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे आता पुढच्या काळात संबंधित मंत्र्यांना नारळ देणार की कायम ठेवणार हे पहावे लागणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!