Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवारांच्या ‘नाईलाज’मुळे महाविकास आघाडीत फूट

काँग्रेसचा राष्ट्रवादीला सुचक इशारा, राज्यात नाना विरूद्ध दादा वादाची ठिणगी पेटणार

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढत चालला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले म्हणाले की, नाईलाज हा शब्द का वापरत आहात ? असे होते तर मग तुम्ही शपथच घ्यायला नको होती. तुम्ही पदावर बसून खदखद व्यक्त करण्यापेक्षा पद सोडून बोलायला पाहिजे होतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विषयी अजित पवार बोलतील ही अपेक्षा नव्हती. त्यांच्याबद्दल असे बोलणे चुकीचे आहे. ते खुर्चीवर असताना तुम्हाला असं वाटत होतं तर त्यावेळीच सोडून जायला हवं होते, असे पटोले म्हणाले आहेत त्याचबरोबर आताही मुख्यमंत्री होऊ शकतो या अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ‘अजित पवारांकडे १४५ आमदार असतील तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. सारखं मी मुख्यमंत्री बनतो, असं म्हणायची काही गरज नाही. खरं तर आज राज्यात अनेक प्रश्न आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. खारघरमध्ये श्रीसेवकांचा मृत्यू झाला. महागाईमुळे जनता परेशान आहे. बेरोजगार वाढत आहे, त्यामुळे अशा राजकीय विषयांकडे लक्ष देण्यापेक्षा या मुद्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे. गौतम अदाणी आणि शरद पवार यांच्या भेटीवरही भाष्य केलं आहे. कोण कोणाला भेटतं हा ज्याचा-त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र आम्ही सर्व घडामोडींकडे लक्ष ठेऊन आहोत, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे.

अजित पवार यांच्या पृथ्वीबाबांविषयीच्या वक्तव्यामुळे नाना पटोले संतापले आहेत. त्यांनी अजित पवार यांनी असं वक्तव्य करणं बरोबर नाही म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्यात नाना पटोले विरूद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळणार का? हा प्रश्न चर्चेत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!