Latest Marathi News
Ganesh J GIF

काँग्रेस नेते म्हणतात ‘राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी’

काँग्रेस नेत्याचा काँग्रेसला घरचा आहेर, गांधीनी माफी मागण्यात गैर काय? विचारला सवाल

नागपूर दि २५(प्रतिनिधी)- कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच भाजपाने राहुल गांधीनी ओबीसींची माफी मागावी अशी मागणी केली आहे. आता मात्र, कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांनीच राहुल गांधी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. राहुल गांधींनी माफी मागावी, अन्यथा याचा मोठा फटका कॉंग्रेसला बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे पक्षातील बेदिली उघड झाली आहे.

काँग्रेस नेते आशिष देशमुख म्हणाले की, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सर्व जातीधर्माच्या लोकांना जोडण्याचं काम राहुल गांधी यांनी केले आहे. कन्याकुमारीपासून श्रीनगरपर्यंत भारत जोडो यात्रेदरदम्यान, ते साडेतीन हजार किलोमीटर चाालले. या यात्रेमुळे राहुल गांधी हे लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले आहेत. अशा वेळी २०१९ मध्ये त्यांच्या तोंडून काही शब्द गेले असतील ज्यामुळे ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर राहुल गांधी यांनी मोठ्या मनाने ओबीसी समाजाची माफी मागावी. एखाद्या समाज घटकाला चोर म्हणणं हे योग्य नाही, असं देशमुख म्हणाले आहेत. यावेळी गांधी माफी मागणार नाहीत या भुमिकेलाही देशमुख यांनी छेद दिला आहे. राहुल गांधी यांनी अनेकदा माफी मागीतली आहे. ‘चौकीदार चोर है’ च्या संदर्भात त्यांनी कोर्टात मागितली. राफेलच्या संदर्भा केलेल्या वक्तव्यामुळे अनेकजण नाराज झाले होते. त्यावेळीही त्यांनी सुप्रीम कोर्टात माफी मागितली होती, याची आठवण त्यांनी करुन दिली आहे. एकप्रकारे देशमुख यानी आपल्याच पक्षाला खडे बोल सुनावले आहेत.

येणाऱ्या काळात कर्नाटक, राजस्थान या राज्यांच्या निवडणूका आहेत. पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका आहेत. राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही तर आगामी काळात ओबीसी समाज हा कॉंग्रेसकडे पाठ फिरवून भाजपकडे जाऊ शकतो. त्यामुळे राहुल गांधी यांनी माफी मागावी असा पुनरूच्चार आशिष देशमुख यांनी केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!